पोस्ट्स

सप्टेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावळा गोंधळ!!

इमेज
September 2011 मी लहान असताना.. म्हंजे आता काही फार मोठा झालोय अशी गोष्ट नाहीये, पण शरीराने लहान असताना.. रविवारी संध्याकाळी मराठी सिनेमा लागायचा दूरदर्शन वर. जर जुना कृष्णधवल पिक्चर असला तर थोडे बोर व्हायचे, कारण आम्हा सगळ्या पिल्लावळीला लक्ष्याचे 'इनोदी' सिनेमे लय आवडायचे. तरीपण फॉर अ चेंज, हे  सिनेमे पण बघायचो. त्यात जर कथेला गावरान बाज असेल तर एक पात्र नेमकं असणारच. ते म्हणजे, तिरकस डोक्याचा सरपंच नाहीतर सावकार. संपतराव हे नाव माझ्या डोक्यात दुष्ट मनुष्य चे समानार्थी बनले आहे हे त्यामुळेच. हा संपतराव साकारावा तो राजशेखर या गुणी अभिनेत्यानेच. त्यांची बेरकी नजर आणि कारस्थानी हावभाव.. डोक्यात तिडीकच जायची, अस्सा राग यायचा म्हणून सांगू.. सदमा चा शेवट बघून रडण्याचे दिवस ते, पुढे जशी समज यायला लागली तशी या संपतरावला एन्जॉय करायची पण सवय लागली. त्याचे टिपिकल डायलॉग - "गावात नवीन पाखरू आलं वाटतं", "लय मस्ती भरली अंगात".. मजा यायची. मग जसे कॉलेज चे दिवस सुरु झाले, मग हे डायलॉग मित्रांमध्ये कॉमन झाले. अतुल हा माझ्या खास मित्रांपैकी एक. हा पोरगा बरोबर असला तर कुणा