पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

इमेज
भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का? आणि का? आपल्या देशाच्या आकारमानाने हा खर्च अवाढव्य नक्कीच नाही. अवाढव्य खर्च हे विशेषण संरक्षण खर्चाच्या बाबतीत योग्य शोभेल. भारताला स्वतःचा अवकाश कार्यक्रम का हिताचा आहे, हे आता सर्वश्रुत आहेच. मी तुम्हाला एक आणखी बाजू सांगतो. कोणत्याही देशाला त्याची ओळख बनवावी लागते. बनवली नाही तरी ती आपसूक बनते. काहीवेळा चांगली असते काहीवेळा देशांतर्गत दुर्जनांमुळे किंवा देशाबाहेरच्या हितशत्रूंमुळे वाईटही ओळख बनते. सरकार वेळोवेळी इनक्रेडिबल इंडिया सारख्या जाहिरात मोहीमा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्याचे काम करत असते. पण अशा जाहिराती एका ठराविक मर्यादेपर्यन्तच काम करू शकतात. तरीही अशा आंतरराष्ट्रीय जाहिरातींना काही कमी खर्च येत नाही.[१] मग त्यापण करू नयेत का? आता तुम्ही म्हणाल इथे अवकाश मोहिमांचा काय संबंध? आहे. भारताच्या अवकाश मोहीमा हा त्याच्या ओळखीचा, ब्रॅण्डिंग चा भागही आहेत. वैज्ञानिक प्रगती, स्वनिर्मित तंत्रज्ञान, परकीय चलन, भविष्यामधील आव्हानांची तयारी, प्रगत देशांच्या मध्ये मान आणि शत्रुदेशांना धाक या पल

विरळ आणि संस्मरणीय

इमेज
तुम्ही अशी कोणती नैसर्गिक घटना अनुभवली जी इतकी विरळ आहे की परत ती बघणे होणार नाही असे तुम्हाला वाटते? 1. सिंहेचा उल्कावर्षाव हा उल्कावर्षाव दरवर्षी 17 नोव्हेंबर च्या पहाटे दिसतो. टेम्पल टटल हा धूमकेतू दर काही दशकांनी सुर्याजवळ येतो. या धूमकेतूने मागे ठेवलेल्या कणांमधून पृथ्वी जाते तेव्हा हे कण आणि कधीकधी मोठे दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हा उल्कावर्षाव दरवर्षी जरी घडत असला तरी काही दशकांमध्ये याचा जोर जास्त असतो. धूमकेतू जर अलीकडेच सुर्याजवळ येऊन गेला असेल तर आकाशात आतषबाजी सारख्या उल्का दिसू शकतात. साल 1998 का 99 ला नक्की आठवत नाही. जगभरात या वर्षी leonids shower जबरदस्त होणार म्हणून उत्साह होता. मी माझ्या एका मित्राला तयार केले आणि 17 नोव्हेंबर च्या रात्री 3 वाजताच्या दरम्यान आम्ही अंधाऱ्या परेड ग्राउंडवर पोचलो. सुरवातीला मान वर करून पाहत होतो पण थोड्या वेळातच ओणवे व्हायची वेळ आली. पावसा सारख्या नाही पण मिनिटाला 4–5 उल्का पाहिल्याचे आठवते. आम्ही काही तास तो सोहळा पाहिला. त्या रात्रीनंतर मी कधीही एवढ्या मोठया प्रमाणात उल्का पहिल्या नाहीत. Leonids - Wikipedia 2. ' तोतापुर

ऐकण्याचे कौशल्य

इमेज
"ऐकणे” (लिसनिंग स्किल) हे कौशल्य कसे रूजवतां येईल हा अतिशय चांगला प्रश्न आहे. संवादामध्ये समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे हे फार महत्वाचे आहे. जर आपण त्या संवादातून स्वतःच्या जाणिवेमध्ये वृद्धी नाही केली आणि आपले स्वतःचेच आधीच तयार असलेले विचार रेटले तर त्या संवादाचा आपल्याला काय उपयोग? स्वतः शहाणे आहोत हा इगो कुरवाळता येईल, पण काही मूल्यवर्धन होणार नाही. बऱ्याचदा आपण संवाद करताना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे समोरचा कधी आपलं म्हणणं संपवतोय याची आपण अधीरतेने वाट पाहतो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती नक्की काय म्हंटली हे अर्धेअधिक निसटून जाते. आणि फक्त आपल्याला आधीच अपेक्षित असलेले शब्द, विचार हेच नेमके पकडून त्याच्यावरच आधारित आपले उत्तर देऊन आपण त्या संवादाची दिशा आपल्याला हवी तशी वळवतो. पण हा सुसंवाद नाही. सुसंवादात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार ऐकून घेतले गेले आणि दुसऱ्याचे विचार समजले अशी भावना आली पाहिजे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संवादामध्ये चांगले ऐकण्यासाठी हे करायला हवे - १. आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकत तर नाही आहोत ना याचे भान ठेवावे. काही सेकंदापु

The ruthless shrink we all need

इमेज
Which supporting character stole the scene every time they appeared? Jane Lynch. There are very few TV series fans who haven’t watched Two and a Half Men. The series was a brilliant comedy until Charlie Sheen had his act together. I believe the series started to deteriorate well before his meltdown, somewhere around season 3. However, I must admit that immersing myself in the humor, memorable quips, and performances of the unforgettable actors was one of life's joys. However, had it not been for the sheer brilliance of Jane Lynch, I would have rated the series 50% lower. This realization came to me in retrospect because whenever I feel like rewatching anything related to Two and a Half Men, I instinctively search for those scenes on YouTube, specifically "when Charlie goes to the shrink." Jane Lynch portrayed the character to perfection, breathing life into the therapist. Her hippie wardrobe became an integral part of the character, and the dialogues were a treat. The sar

लग्न पहा 'बे' करून

इमेज
  सध्या लग्न जुळवणे कठीण का होत चालले आहे? मी लग्नाच्या वयाचा झालो असताना, म्हणजे साधारण सव्वीसाव्या वर्षी यावर गहन विचार केला होता. गहन विचार करणे हा स्थायीभाव असल्याने, लग्न जुळण्याच्या काठिण्यपातळीत वाढच झाली होती. तर हे त्या वेळेचे विचार मी माझ्या ब्लॉग पोस्ट मध्येसविस्तर पणे मांडले आहेत [1] . इथे  ते आणि आणखी काही मुद्दे सांगतो - १.  माणसाचे वाढलेले आयुष्यमान  आणि त्यात आलेले सातत्य हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५०-६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि नावडता प्रकार

स्टॅचू ऑफ युनिटी - फसलेला प्रकल्प का फायद्याची गुंतवणूक?

इमेज
Did the Statue of Unity in India fail? मी २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटी ला भेट दिली. स्टॅचू ऑफ युनिटी बडोद्यापासून साधारण ८० किमी वर असलेल्या केवडीया या छोट्या गावाजवळ आहे. मी तिथे बडोद्यावरून साधारण ५ वाजता पोचलो. तिथे दोन प्रकारचे तिकीट मिळतात. पहिल्या प्रकारचे १२० रुपयांचे तिकीट घेऊन तुम्ही पुतळ्याच्या पायाजवळ जाऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे तिकीट घेऊन तुम्हाला सरदार पुतळ्याच्या छातीपर्यंत असलेल्या निरीक्षण दालनापर्यंत जाता येते. हे तिकीट ३५० रुपयांना मिळते. मला खरेतर उंचीवर असेलेल्या या निरीक्षण दालनापर्यंत (Observation Deck) जायचे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाग तिकिटे संपली होती. तिकीट खिडकीवरच्या क्लर्क ने सांगितले की ही तिकिटे मर्यादित असतात आणि दिवसाला "फक्त" ७००० तिकिटेच दिली जातात. मी सप्ताहांतात आलो नव्हतो. तो शुक्रवार होता तरीही ही महाग तिकिटे चक्क संपली होती. थोडा हिरमोड झाला, पण माझ्याबरॊबर बरेच लोक होते ज्यांना ही तिकिटे मिळाली नव्हती. नाईलाजाने नॉर्मल तिकीट घेतले. ७००० तिकिटे दर दिवसाला आणि नॉर्मल तिकिटे कितीही. आता तुम्हीच अंदाज लावा. स्

परोपकार की स्वउपकार?

इमेज
तुम्ही अशी कोणती गोष्ट परोपकार म्हणून केली पण त्याचा तुम्हालाच प्रत्यक्ष फायदा झाला? साधारण २००८ च्या दरम्यान मी एकदा वृत्तपत्रात एक लेख वाचला. त्यात लेखकाने त्यांचा अनुभव कथन केला होता. सामसूम रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपले आणि एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल देऊन लेखकाला मदत केली. जेव्हा लेखक त्या स्वाराला पैसे देऊ लागला तेव्हा त्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले की मोबदला द्यायचाच असेल तर लेखकाने देखील आपल्याबरोबर पाईपचा तुकडा ठेवावा आणि इतर बाईकस्वारांना अडीनडीला मदत करावी. मला ही कल्पना चांगलीच आवडली. मी माझ्या शहरात असे बाइक ढकलणारे लोक बरयाचदा पाहिले होते. माझ्या ऑफिस व घरामधील रस्त्यात 5-6 किलोमीटरच्या परिसरात पेट्रोल पंपच नव्हता. त्या मार्गावर,अशी दृश्ये जवळपास प्रत्येक आठवड्यात दिसायची. मी स्वतःला या अडचणीत एकदा दोनदा सापडलो होतो.चला, एक चांगले पुण्याचे काम करूया या भावनेने मी माझ्या ऑफिस बॅगमध्ये एक सायफन नळी आणि एक छोटी प्लास्टिकची बाटली ठेवण्यास सुरुवात केली. गाडी ढकलून बेजार झालेले, थकलेले, स्वतःला दोष देत चाललेल्या दुचाकी स्वा

ते देवाचं असतं !

इमेज
बोल्हाईचे मटण काय असते? पुण्याजवळ वाघोलीच्या पुढे वाडेबोल्हाई हे गाव आहे. तेथील बोल्हाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्याजवळच्या गावांतील काही कुटुंबांना या देवीचे काही नियम लागू होतात. याला देवी आहे असे म्हणतात. उदाहरण म्हणजे माझ्या कुटुंबाला बोल्हाई आहे. या देवीला शेळी (बेकरीचे) बळी चालत नाही. मेंढी चालते. साहजिकच ज्या कुटुंबाना ही देवी आहे त्यांना बेकरीचे मटन वर्ज्य असते. म्हणजे आमच्या कुटुंबात कधीच शेळीचे मटण खात नाहीत. तसे पाहिले तर मटणच फार कमी वेळा होते पण खाल्लेच तर मेंढीचेच. माझी आजी तर असे म्हणायची की या बोल्हाई असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना शेळीच्या मटणाचे खरकटे पाणी देखील ओलांडायचे नसते. जर शेळीचे मटण खाण्यात आले तर शरीरावर काहीतरी पुरळ, खाज या स्वरूपात प्रतिक्रिया उठतात. नंतर बोल्हाईला जाऊन काहीतरी विधी करावे लागतात. हे असे असल्यामुळे या व्यक्ती शेळीच्या मटणाच्या खानावळी हॉटेल्स टाळतात. त्यामुळे जसे काही हॉटेल्स वर जसे "शुद्ध शाकाहारी" लिहिलेले असते तसे काही ठिकाणी "फक्त बोल्हाई चे मटण" अशी पाटी असते. उद्देश हाच की हे शुद्ध बोल्हाई वाल्या लोकांच

मला (न) समजलेले बाबा

इमेज
तुम्ही अलीकडे कोणते पुस्तक वाचले आणि त्याबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे? मी २०१९ च्या मार्च महिन्यात डॉ प्रकाश आमटे जिथे कार्यरत आहेत अशा हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. बाबा आमटे, त्यांची समाजासाठी आयुष्य अर्पण केलेली डॉ विकास आणि प्रकाश आमटे ही मुले, डॉ भारतीताई आणि मंदाकिनी या कर्तृत्ववान सुना, सेवापरायण परिवार आणि निष्ठावंत, सेवाखोर कार्यकर्ते याबद्दल माहिती नसणारी व्यक्ती विरळाच. (सेवाखोर हा बाबा आमटेंच्या एका कवितेत आलेला शब्द आहे. The one who cannot help but help) चंद्रपूर जवळचे आनंदवन आणि गडचिरोली च्या निबिड अरण्यातले हेमलकसा याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. ते कधीतरी दुसऱ्या पोस्ट मध्ये. डॉ प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा ही आत्मकथा मी तिथे जाण्याअगोदरच वाचली होती. तिथे गेल्यावर मी आणखी काही पुस्तके घेतली. त्यात डॉ प्रकाश आमटेंचे हेमलकसा येथील सहकारी आणि बाबा आमटेंसोबत बराच काळ व्यतीत केलेले विलास मनोहर यांची दोन पुस्तके होती. त्यातले नेगल हे पुस्तक मी लागोलाग वाचून काढले. नव्वद च्या दशकात शाळेत असताना हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयात खूपच विद्यार्थीप्रिय होते. तेव

कंट्रोल उदय कंट्रोल

इमेज
मी ऑफिसमध्ये मराठी सहकाऱ्यांशी मराठीत बोलत असतो तेव्हा हिंदी भाषिक लोक जे त्या संवादाचा भागही नसतात ते चिडतात आणि 'हिंदी में बात करो यार, यह देहाती भाषा मत बोलो' असं म्हणतात. मी काय करावे? ही वेळ आली का? असो.. काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी असले नखरे सहन करत नाही. आमच्या सोसायटीचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. तिथे बऱ्याच गोष्टी जसे पाणी, सुरक्षा, साफसफाई, डागडुजी असले विषय असतात. ७0 टक्के पब्लिक मराठीच असेल. उरलेलं हिंदीभाषिक आणि बाकीचे. त्यामुळे एक सौजन्य म्हणून बहुतांश संवाद इंग्रजी आणि थोडे हिंदी आणि त्याहून कमी मराठी असतात. या ग्रुपमध्ये बरेच जण इंग्रजी व्याकरणाची लक्तरे निघाली तरी हिंदी किंवा मराठी संदेश टाळतात. त्यात काही जण तर इंग्रजीच्या भीतीने "काही सांगायचे आहे पण बोलणार नाही" या न्यायाने कधीच संदेश पाठवत नाहीत. तर झाले असे, की आमच्या सोसायटीच्या अध्यक्षाने पाण्याविषयी एक पोस्ट टाकला. महापालिकेकडून आलेल्या मराठी नोटिशी त्यांनी बऱ्याचदा जशाच्या तशा टाकल्या होत्या.त्यावर ग्रुप मधल्या एक दाक्षिणात्य महिलेने लागलीच "इथे मराठी चालणार नाही&quo

नास्तिक आणि अज्ञेयवादी

इमेज
नास्तिक आणि अज्ञेयवादी यांच्यामध्ये काय फरक आहे? व्वा.. अज्ञेयवाद. नवीन मराठी शब्द समजला आज. Atheist - नास्तिक म्हणजे जे देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही असे लोक. त्यांच्या मते विश्वाचा पसारा, ही सृष्टी, उत्क्रांतीची सुरुवात हे केवळ एका वैश्विक योगायोगचा (cosmic coincidence) परिणाम आहे. इथे एक ठराविक कार्यकारण भाव आहे आणि दैव किंवा देव अशी कोणतीही गोष्ट सृष्टीत अस्तित्वात नाही असे यांचे ठाम मत असते. Agnostic - अज्ञेय म्हणजे असे लोक की जे मान्य करतात की काही गोष्टी अगम्य आहेत. कार्यकारणाचे नियम तिथे लागू होत नाहीत आणि अशा गोष्टींना फक्त वैश्विक योगायोग मानणे त्यांना चुकीचे वाटते. अशा लोकांच्या मते काहीतरी अगम्य शक्ती या सृष्टीमागे कार्यरत आहे पण ती परंपरेनुसार चालत आलेल्या देवाच्या कल्पनेसारखी नसून वेगळी असू शकते. मी स्वतःला अज्ञेय मानतो. देवाच्या अस्तित्वाचा शास्त्रीयदृष्ट्या पुरावा देता येत नसला तरी तो नसल्याचा ठोक पुरावाही देता येत नाही. पण त्यामुळे मला देव मानायलाच पाहिजे असेही नाही. अज्ञेय असल्यामुळे मी देवळात पण जातो आणि अनाठायी कर्मकांड करायला नाही पण म्हणू शकतो. हे निर्णय घ्याय

धरलं तर चावतंय

इमेज
चित्रपट डाऊनलोड करून पाहू नये, चित्रपटगृहातच बघावा असा विचार करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? उत्तर देण्याआधी प्रश्नकर्त्याला नक्की काय अभिप्रेत आहे ते पाहावे लागेल. हा प्रश्न नक्कीच पांढरा-काळा प्रकारातला नाही. परिस्थितीनुरूप उत्तर बदलू शकते. प्रयत्न करतो. इथे डाउनलोड करून पाहणे म्हणजे "पायरेटेड प्रत बघणे" असा अर्थ असेल तर मी त्याच्या 80% विरोधात आहे. बाकीचे 20 टक्के कुठे गेले समजण्यासाठी पूर्ण उत्तर वाचावे लागेल. जर स्ट्रीमिंग सेवा जसे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम, झी5 वर चित्रपट पाहायचा असेल तर काहीच हरकत नसावी. गूगल प्ले वर देखील अतिशय रास्त दरात भाड्याने सिनेमा उपलब्ध करून देते. अशावेळी आपण या स्ट्रीमिंग माध्यमांनी सिनेमा बघितला तर त्याचा योग्य मोबदला निर्मात्यां ना मिळत असतो. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळी चा हम्पी हा सुंदर सिनेमा बघण्यासाठी मी झी5 चे वर्षभराचा रतीब घेतला. संभाजी आणि चला हवा येऊ द्या ब्रेक फ्री बघता येते आणि याच्या नवऱ्याची त्याची काय ते आईला मोबाईल वर लावून देऊन पैसे वसूल करतो. बाहुबली, पानिपत किंवा

चंद्र आहे साक्षीला

इमेज
जर चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या भोवती फिरतो तर चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये परिभ्रमण करणाऱ्या अवकाशयानामध्ये गुरुत्वाकर्षण का जाणवत नाही? प्रश्न मनोरंजक आणि तितकाच वैध आहे. मलाही हा प्रश्न पडायचा. सर्वप्रथम हा प्रश्न मला कसा समजतोय ते मी सांगतो. आपण बरयाचदा टीव्ही, युट्युब वर ISS (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) मध्ये असलेल्या अंतराळवीरांचे विडिओ बघतो. ते तरंगत असतात. याचा अर्थ ISS मधल्या वस्तू आणि व्यक्तींवर जवळ जवळ गुरुत्वाकर्षण शून्य असते. ISS पुर्थ्वीपासून साधारण ४०० किमी वरून घिरट्या घालत आहे. चंद्र जवळपास पावणेचार लाख किमी वर आहे. मग चंद्राला खेचणारे हे बल ४०० किमी वरच्या स्थानकात गायब होते का? आता याचे उत्तर पाहू. जे गुरुत्व बल चंद्र आणि पृथ्वी ला एकमेकाबरोबर बांधून ठेवते तेच बल ISS आणि इतर अवकाशस्थ उपग्रहांना देखील पृथ्वीभोवती बांधून ठेवते. अवकाशात गुरुत्व नसते ही खूप चुकीची कल्पना आहे. एखाद्या वस्तूचे गुरुत्व त्यापासून जितके लांब जाल तितक्या अंतराच्या प्रमाणात क्षीण होत जाते. पण कधीही शून्य होत नाही. सैद्धांतिक दृष्ट्या तरी नाही. मग अंतराळात गोष्टी तर

इतिहासातून भविष्य घडवण्यासाठी

इमेज
खरंच शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणे गरजेचे आहे का? आपण महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी हा पुतळा उभारू शकत नाही का? हा पुतळा उभारायचाच असेल तर महाराष्ट्रातील एखाद्या दुष्काळी पट्ट्यात उभारावा. पुण्या, मुंबई, नागपूरवरून तिथे जाण्यासाठी 6 पदरी हायवे तयार करावा, जेणे करून तिथला विकास जोर धरेल, तिथल्या स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. मुंबईसारख्या आधीच विकसित आणि लोकसंख्याबहुल भागामध्ये आणखी एक गर्दीचे ठिकाण वाढवून काय साध्य करणार? गुजरात मध्ये देखील स्टॅच्यु ऑफ युनिटी अशाच ठिकाणी आहे जिथे 80 किलोमीटर च्या वर्तुळात एकही मोठे शहर नाही. तिथे या भव्य पुतळ्यासारखे पर्यटन आकर्षण बनवून गुजरात सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. या पुतळ्याबरोबर महाराजांच्या शेकडो गडकिल्ल्यांपैकी किमान दहा किल्ले तरी युरोपमधल्या पर्यटन स्थळांसारखे विकसित केले तर मोठे काम होईल. महाराजांच्या नावाचा वापर फक्त आपली पोळी भाजण्यासाठी करणाऱ्या, एकमेकांच्या आमदारांना चोरासारखे लपवणार्या लोकांकडून ही अपेक्षा नाही हे वेगळे सांगणे नकोच. फ्रेब्रुवारी 2019 मध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी बघण्याची संधी मिळाली. त्य

शेतकरी आणि फेसबुक

इमेज
फेसबूक, गूगल, मोबाइल व टीव्ही शिवाय आपण जगू शकतो तरीही यांना बनवणारी मंडळी जगातील सर्वात श्रीमंत आहेत पण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही तरीही माझा शेतकरी फार गरीब आहे, असं का? पाणी आणि हवेशिवाय माणूस जगू शकत नाही तरीपण शुद्ध पाणी जास्तीत जास्त 20 रुपये लिटर तर हवा फुकट आणि सोने आणि चांदी खाता येत नाहीत तरीपण बहुमोल, असे का? असाच काहीसा तर्क आहे प्रश्नकर्त्याचा. वस्तूची किंमत उपयुक्तता, मागणी आणि पुरवठा या तत्वावर ठरते. पाणी उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे पण पुरवठा देखील जास्त आहे त्यामुळे किंमत कमी. सोने उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी म्हणून किंमत जास्त. केशर उपयुक्त, मागणी कमी आणि पुरवठा त्याहून कमी त्यामुळे किंमत जास्त.करोना वायरस च्या काळात - चिकन उपयुक्त, मागणी कमी, आणि पुरवठा जास्त म्हणून किंमत कमी. [१] आता शेतमाल म्हणाल तर उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे आणि पुरवठा देखील जास्त आहे त्यामुळे किंमती कमी. मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाले तर स्कॉर्पिओ मागे "ही कांद्याची कृपा" लिहिलेले देखील आपण पाहिले आहे. 'फेसबुक, गूगल यासारख्या कंपन्या उपयुक्त नाहीत' ही