शेतकरी आणि फेसबुक
फेसबूक, गूगल, मोबाइल व टीव्ही शिवाय आपण जगू शकतो तरीही यांना बनवणारी मंडळी जगातील सर्वात श्रीमंत आहेत पण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही तरीही माझा शेतकरी फार गरीब आहे, असं का? पाणी आणि हवेशिवाय माणूस जगू शकत नाही तरीपण शुद्ध पाणी जास्तीत जास्त 20 रुपये लिटर तर हवा फुकट आणि सोने आणि चांदी खाता येत नाहीत तरीपण बहुमोल, असे का? असाच काहीसा तर्क आहे प्रश्नकर्त्याचा. वस्तूची किंमत उपयुक्तता, मागणी आणि पुरवठा या तत्वावर ठरते. पाणी उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे पण पुरवठा देखील जास्त आहे त्यामुळे किंमत कमी. सोने उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी म्हणून किंमत जास्त. केशर उपयुक्त, मागणी कमी आणि पुरवठा त्याहून कमी त्यामुळे किंमत जास्त.करोना वायरस च्या काळात - चिकन उपयुक्त, मागणी कमी, आणि पुरवठा जास्त म्हणून किंमत कमी. [१] आता शेतमाल म्हणाल तर उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे आणि पुरवठा देखील जास्त आहे त्यामुळे किंमती कमी. मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाले तर स्कॉर्पिओ मागे "ही कांद्याची कृपा" लिहिलेले देखील आपण पाहिले आहे. 'फेसबुक, गूगल यासारख्या कंपन्या उपयुक्त नाहीत' ही ...