पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धरलं तर चावतंय

इमेज
चित्रपट डाऊनलोड करून पाहू नये, चित्रपटगृहातच बघावा असा विचार करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? उत्तर देण्याआधी प्रश्नकर्त्याला नक्की काय अभिप्रेत आहे ते पाहावे लागेल. हा प्रश्न नक्कीच पांढरा-काळा प्रकारातला नाही. परिस्थितीनुरूप उत्तर बदलू शकते. प्रयत्न करतो. इथे डाउनलोड करून पाहणे म्हणजे "पायरेटेड प्रत बघणे" असा अर्थ असेल तर मी त्याच्या 80% विरोधात आहे. बाकीचे 20 टक्के कुठे गेले समजण्यासाठी पूर्ण उत्तर वाचावे लागेल. जर स्ट्रीमिंग सेवा जसे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम, झी5 वर चित्रपट पाहायचा असेल तर काहीच हरकत नसावी. गूगल प्ले वर देखील अतिशय रास्त दरात भाड्याने सिनेमा उपलब्ध करून देते. अशावेळी आपण या स्ट्रीमिंग माध्यमांनी सिनेमा बघितला तर त्याचा योग्य मोबदला निर्मात्यां ना मिळत असतो. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळी चा हम्पी हा सुंदर सिनेमा बघण्यासाठी मी झी5 चे वर्षभराचा रतीब घेतला. संभाजी आणि चला हवा येऊ द्या ब्रेक फ्री बघता येते आणि याच्या नवऱ्याची त्याची काय ते आईला मोबाईल वर लावून देऊन पैसे वसूल करतो. बाहुबली, पानिपत किंवा

चंद्र आहे साक्षीला

इमेज
जर चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या भोवती फिरतो तर चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये परिभ्रमण करणाऱ्या अवकाशयानामध्ये गुरुत्वाकर्षण का जाणवत नाही? प्रश्न मनोरंजक आणि तितकाच वैध आहे. मलाही हा प्रश्न पडायचा. सर्वप्रथम हा प्रश्न मला कसा समजतोय ते मी सांगतो. आपण बरयाचदा टीव्ही, युट्युब वर ISS (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) मध्ये असलेल्या अंतराळवीरांचे विडिओ बघतो. ते तरंगत असतात. याचा अर्थ ISS मधल्या वस्तू आणि व्यक्तींवर जवळ जवळ गुरुत्वाकर्षण शून्य असते. ISS पुर्थ्वीपासून साधारण ४०० किमी वरून घिरट्या घालत आहे. चंद्र जवळपास पावणेचार लाख किमी वर आहे. मग चंद्राला खेचणारे हे बल ४०० किमी वरच्या स्थानकात गायब होते का? आता याचे उत्तर पाहू. जे गुरुत्व बल चंद्र आणि पृथ्वी ला एकमेकाबरोबर बांधून ठेवते तेच बल ISS आणि इतर अवकाशस्थ उपग्रहांना देखील पृथ्वीभोवती बांधून ठेवते. अवकाशात गुरुत्व नसते ही खूप चुकीची कल्पना आहे. एखाद्या वस्तूचे गुरुत्व त्यापासून जितके लांब जाल तितक्या अंतराच्या प्रमाणात क्षीण होत जाते. पण कधीही शून्य होत नाही. सैद्धांतिक दृष्ट्या तरी नाही. मग अंतराळात गोष्टी तर

इतिहासातून भविष्य घडवण्यासाठी

इमेज
खरंच शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणे गरजेचे आहे का? आपण महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी हा पुतळा उभारू शकत नाही का? हा पुतळा उभारायचाच असेल तर महाराष्ट्रातील एखाद्या दुष्काळी पट्ट्यात उभारावा. पुण्या, मुंबई, नागपूरवरून तिथे जाण्यासाठी 6 पदरी हायवे तयार करावा, जेणे करून तिथला विकास जोर धरेल, तिथल्या स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. मुंबईसारख्या आधीच विकसित आणि लोकसंख्याबहुल भागामध्ये आणखी एक गर्दीचे ठिकाण वाढवून काय साध्य करणार? गुजरात मध्ये देखील स्टॅच्यु ऑफ युनिटी अशाच ठिकाणी आहे जिथे 80 किलोमीटर च्या वर्तुळात एकही मोठे शहर नाही. तिथे या भव्य पुतळ्यासारखे पर्यटन आकर्षण बनवून गुजरात सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. या पुतळ्याबरोबर महाराजांच्या शेकडो गडकिल्ल्यांपैकी किमान दहा किल्ले तरी युरोपमधल्या पर्यटन स्थळांसारखे विकसित केले तर मोठे काम होईल. महाराजांच्या नावाचा वापर फक्त आपली पोळी भाजण्यासाठी करणाऱ्या, एकमेकांच्या आमदारांना चोरासारखे लपवणार्या लोकांकडून ही अपेक्षा नाही हे वेगळे सांगणे नकोच. फ्रेब्रुवारी 2019 मध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी बघण्याची संधी मिळाली. त्य

शेतकरी आणि फेसबुक

इमेज
फेसबूक, गूगल, मोबाइल व टीव्ही शिवाय आपण जगू शकतो तरीही यांना बनवणारी मंडळी जगातील सर्वात श्रीमंत आहेत पण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही तरीही माझा शेतकरी फार गरीब आहे, असं का? पाणी आणि हवेशिवाय माणूस जगू शकत नाही तरीपण शुद्ध पाणी जास्तीत जास्त 20 रुपये लिटर तर हवा फुकट आणि सोने आणि चांदी खाता येत नाहीत तरीपण बहुमोल, असे का? असाच काहीसा तर्क आहे प्रश्नकर्त्याचा. वस्तूची किंमत उपयुक्तता, मागणी आणि पुरवठा या तत्वावर ठरते. पाणी उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे पण पुरवठा देखील जास्त आहे त्यामुळे किंमत कमी. सोने उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी म्हणून किंमत जास्त. केशर उपयुक्त, मागणी कमी आणि पुरवठा त्याहून कमी त्यामुळे किंमत जास्त.करोना वायरस च्या काळात - चिकन उपयुक्त, मागणी कमी, आणि पुरवठा जास्त म्हणून किंमत कमी. [१] आता शेतमाल म्हणाल तर उपयुक्त आहे, मागणी जास्त आहे आणि पुरवठा देखील जास्त आहे त्यामुळे किंमती कमी. मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाले तर स्कॉर्पिओ मागे "ही कांद्याची कृपा" लिहिलेले देखील आपण पाहिले आहे. 'फेसबुक, गूगल यासारख्या कंपन्या उपयुक्त नाहीत' ही

The Puzzle In Tumbbad

इमेज
What is special about the movie Tumbbad? Warning: Spoilers ahead - a crucial puzzle piece. I had the opportunity to watch Tumbbad twice at the cinema, and it has undoubtedly become one of my top 5 favorite movies. I immediately wrote about it on my blog, recognizing its rightful place as a cult classic. Besides its exceptional cinematography, captivating story, mesmerizing music, and brilliant acting, what fascinated me the most was that Tumbbad presented its audience with a puzzle to solve. The filmmakers didn't explicitly explain every aspect of the script, trusting the viewers to fill in the details themselves, and it worked wonderfully. For a long time, I pondered over a particular puzzle: If the curse was eternal, how was death possible? In a way, the death of Vinayak's grandmother offered her redemption from the curse. Or did it? No, the answer lies within the movie itself. Despite Vinayak killing his grandmother after she revealed the secret of harvesting gold from Hasta

कोंबडीने रस्ता का ओलांडला?

इमेज
जर आपल्याला कधीतरी मरायचेच आहे, तर एवढे शिक्षण घेऊन व संपत्ती जमा करून उपयोग काय याचे तर्कशुद्ध उत्तर देऊ शकता का? एक मजेशीर वैचारिक प्रश्न आहे. "Why did the chicken cross the road?" "कोंबडीने रस्ता का ओलांडला?" का ओलांडला असेल? वरवर येडचाप वाटणाऱ्या या प्रश्नाला खरेच काही अर्थ आहे का? . . . कोंबडीने रस्ता ओलांडला कारण - ती रस्ता ओलांडू शकत होती. तिला वाटले रस्त्याच्या पलीकडे काहीतरी चांगले असणार. ओलांडला रस्ता. तसेच या प्रश्नाचे उत्तर आहे. "जर आपल्याला एक ना एक दिवशी मरायचे आहे तर एवढे शिक्षण घेऊन, संपत्ती जमा करून उपयोग काय आहे? " शिक्षण घेतले संपत्ती जमा केली कारण ते आम्हाला शक्य होते म्हणून. तुम्ही मला सांगा, जन्माला  आलो तर मृत्यू येणार हे नक्की सर्वांना माहित असतेच. तुम्ही तुमचे आयुष्यात शिक्षण घेऊन, सुयोग्य पद्धतीने संपत्ती जमा नाही केली तरी देखील मृत्यू येणारच आहे. शिक्षण आणि संपत्ती टाळली म्हणून कोणी फार सुखी झाला आणि छान मृत्यू आला असे झाले आहे का? उलट शिक्षण आणि संपत्ती मुळे तुमचे आयुष्य आणि मृत्यू सहन करण्याइतपत चांगले होणार याची शक्यता वाढत ना