पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जब तक है जान-समीक्षेचे समीक्षण

इमेज
मायबोली वरचे रसप यांचे जब तक है जान चे परीक्षण नेटावरती जोमाने फिरत आहे. अतिशय सणसणीत शैलीत शेरूक (हा शब्द तिथेच पहिल्यांदा वाचला आणि जाम हसलो) चा समाचार घेतलाय तिथे. पण त्याने शेरूक् आणि कंपनी - म्हणजे कारण जोहर, फराह खान यांना वाईट वाटायचे काम नाही. कारण हे समीक्षण वाचल्यावर हा पिच्चर चुकूनपण न पाहणारा मी, सहकुटुंब तो बघायला गेलो. आणि या समीक्षेने कुतूहल चाळवलय असे म्हणणारे पण भेटले. रसप ने म्हटल्याप्रमाणे छायाचित्रण नेत्रसुखद आहे. या एका गोष्टीचं भांडवल करून मी माझ्या मनाला समजावलं आणि निघालो. खरंतर अनुष्का शर्माला पोस्टरवर बघूनच मी मनाच्या मागे लागलो होतो.. अरे प्लीज मला बघुदेरे हा पिच्चर! समीक्षेचे समीक्षण म्हणजे भिक्षुकाच्या घरी माधुकरी मागण्यासारखे. पण असो.. फर्स्ट हँड काय सेकंड हँड काय भीक ती भीक. खराडी मध्ये ढीग मॉल चालू झालेत आणि मल्टिप्लेक्स पण. त्यात ते नवीन बॉलीवूड मल्टीप्लेक्स शोधण्यात उशीर झाला. तोवर तो अनुष्काचा बिकिनी सीन होवून गेलेला, फ्लॅशबॅक चालू झालेला, शेरूक लंडन च्या रस्त्यावर गाणं म्हणत होता. हळहळत आई आणि मावशीला सीट शोधून दिल्या. त्यांना चित्

सारांश - अनुपम खेर पर्वाची सुरुवात.

इमेज
आज बऱ्याच दिवसांनी रविवारी दुपारी टी.वी. मोकळा सापडला. बाहेर अशी टळटळीत दुपार असताना मी वेगळ्याच मोड मध्ये असतो. उगाच नोस्टॅल्जिक व्हायला होतं. आता तरुणपणी एकतर बालपण आठवत असणार नाहीतर पूर्वजन्म. काय सांगावं? या अशा मोड मध्ये मला सारांश दिसला. मी आधी बघितला नव्हता. फ़क़्त महेश भटचा आहे आणि काहीतरी भारी वगैरे होता एवढे ऐकून माहिती. सुदैवाने नुकताच चालू झाला होता. जाहिरातींच्या जंजाळातून बऱ्यापैकी बघितला. जे ऐकले होते त्याहीपेक्षा भारी निघाला हा पिक्चर. अनुपम खेरने एका निवृत्त शिक्षकाची भूमिका केलीये. त्याला पाहून वाटले की आताही हा एवढा म्हातारा वाटत नाही म्हणजे या माणसाचं नक्की वय काय? पिच्चर पाहता पाहताच विकीला घेवून बसलो आणि काही रोचक गोष्टी सांगितल्या तिने. सारांशची कथा- प्रधान सर (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी पार्वती (रोहिणी हट्टंगडी) यांचा एकुलता एक मुलगा अजय, न्यूयॉर्क मध्ये भुरट्या चोरांकडून मारला जातो. आपल्या या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या या भावविश्वात एकामागोमाग येणाऱ्या निराशाजनक प्रसंगांनी त्यांची जगायची इच्छाच कोलमडलेली असते. त्यात त्यांना

Dandeli To Goa Via Doodhsagar

इमेज
As Sheldon explained to Raj, the value of certain things lies in their exclusivity, as they become precious to their possessors precisely because others lack them [1]. This idea came to mind after my recent visit to the Tadoba Tiger Reserve, as the Supreme Court of India issued a verdict to completely halt tourist activities in the core zone of tiger reserves. This means that what we saw and experienced inside the Tadoba core zone is now more important to us than ever before, because we have had the chance to witness it while others may never get that opportunity again. Well, maybe I'm being a bit harsh, but honestly, that was my initial reaction upon hearing the news. However, as I delved deeper into my thoughts, I realized that my friends and family, with whom I had planned to revisit and admire those magnificent creatures, would also miss out on the experience. It dawned on me that I might not have the opportunity to explore other reserves again, and this realization left me f

म्हणे आम्ही बिझी झालो-२

इमेज
भाग १ पासून पुढे.  Septermber 2012 मराठी मालिकांनी कहर केलाय. त्याच टिपिकल सास बहु टाईप कथा. पण त्या कमी म्हणून आता बऱ्याच मालिकांत भुताटकी, चेटूक वगैरे वगैरे दाखवायला लागलेत. विरोधाभास बघा- माझे वडील वेळ घालवायला पुस्तके शोधून काढतायेत आजकाल. त्यांना मला कधीकाळी ६वी - ७वीत असताना बक्षीस मिळालेले नरेंद्र दाभोळकरांचे 'श्रद्धा-अंधश्रद्धा' हे पुस्तक मिळाले. ते हातात घेवून ते ती भुक्कड अंगात आलेली "सुवासिनी" बघतात. आता तर कहर झालाय. एकापाठोपाठ "देवयानी", "सुवासिनी", "स्वप्नांच्या पलीकडले" असा रतीब चालुये. तरी बरं माझ्या काका-काकूंकडे फेमस असलेले "पुढचं पाउल" ने इकडे घरात अजूनतरी पाउल ठेवलं नाहीये. या मालिकांमुळे माझे टीवी बघणे महिन्याच्या ३-४ तासांवर आले आहे (अतिशयोक्ती नाही). डिस्कवरी पूर्णपणे गायब झालीये. नॅट-जिओ चा आवाज क्षीण होत गेला. या डेली सोप मालिका जरी महिन्याभरानंतर पाहिल्यातरी तसूभर हललेल्या नसतात. पण आईला म्हटले की हा एवढा पिच्चर बघुदे तर ती म्हणते की "काय तेच तेच पाहतो रे? मला एवढे बघुदे, आज अमकी

म्हणे आम्ही बिझी झालो-१

इमेज
September 2012 आजकाल वेळ कुणाकडे आहे? सकाळी लवकर ऑफिसला जायचे, संध्याकाळी उशिरा यायचे. या महिन्यात दिवसातले तेरा तास मी घराबाहेर असतो आणि तरीही हा महिना त्यातल्या त्यात आराम होता. अशा वेळी घरात बोलायला, सण समारंभ साजरे करायला काय जीव असणारे? आमची पिढी वाया गेली. थोरामोठ्यांचा आदर नाही, देवधर्म नाही, नातीगोती नकोत, भावना नकोत. मित्रांना थातुरमातुर भेटायचे, आठवडी बीयर मारायची, महिन्याभरातून कुठेतरी भटकून यायचे, घरकामाला हात नाही, कुटुंबासाठी चार क्षण नाहीत. हड.. च्यायला वरच्या परिच्छेदातल्या गोष्टी १०० टक्के खऱ्या असतीलही पण तरीही एकांगी आहेत. म्हणे आम्हाला वेळ नाही. मी म्हणतो आमच्या कुटुंबाला आमच्यासाठी वेळ नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी भारतातल्या सुखी कुटुंबव्यवस्थेत एकता कपूर नावाच्या चेटकिणीचा प्रवेश झाला . तिच्यावरच गरळ का, तर तिने लावलेली विषवल्ली आज सर्वदिशा व्यापून उरलीये. जिकडे तिकडे त्या डेली सोप मालिकांनी नुसता हैदोस घातलाय. माझ्या आईने त्या सुमारास "कहाणी घर घर की" बघायला सुरुवात केली. तेवढीच तिला करमणूक म्हणून मला आठवतंय त्याप्रमाणे मी, बाबा, अ

पुण्याला शाप-PMPML

इमेज
पुणे शहराची वाट लागली आहे हे सांगण्यासाठी आता अगदी मकेंझी लावण्याची गरज नाही. जमिनीच्या किमती अवाच्या सवा वाढायला लागल्यावर पुणे मागे पडायला सुरुवात झाली. मागे यासाठी की ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होतोय आणि पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय ते पाहता पुणे आता आपली गमावलेली पत मिळवणार नाही. मला हा साक्षात्कार एकदम का झाला असा प्रश्न पडू शकतो. नाही, मी सिंगापूर, शांघाय किंवा कुठल्याही पाश्चात्य देशात जावून आलो नाही. मी जवळ जवळ गेले वर्षभर बँगलोर ला होतो. असे म्हणतात की बँगलोर बरेच पुण्यासारखे आहे. मलापण हे साम्य जाणवले. त्याच शासकीय संस्था, कॅन्टोनमेंट चे प्रभाग, मोठ्या शिक्षण संस्था, नवी जन्मलेली आयटी पिढी. पण बँगलोर वाढले. नुसतेच वाढले नाहीये, तर सजग पणे वाढले. तिथे आजिबात ट्राफिक जाम नाही? आहे. पण लवकरच ते सुरळीत होईल. तिथे मोठाले शंभर फुटी रोड आहेत. जागोजागी फ्लायओवर बांधले जातायेत. मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा बंगलोरची वाहतूक ही भारतातल्या इतर शहरांना आदर्श ठरणार यात मला मुळीच शंका नाही. कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था हा त्या शहराचा कणा असतो. मा

आईस एज : मैत्र जीवांचे - २

इमेज
आईस एज - हिमयुग ही भौगोलिक अवस्था आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय रित्या घट होऊन हिमनद्या आणि धृवीय बर्फाचा विस्तार वाढतो. सिद्धांतानुसार पृथ्वीमाईच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अशी अनेक हिमयुगे होऊन गेलीयेत. ही तापमानाची घट मनुष्याच्या आयुष्यात जाणवेल एवढ्या वेगाने होत नाही. आणि जर झाली, अगदी २-३ दिवसात झाली, तर काय होईल हे पाहायचे असेल तर "डे आफ्टर टूमॉरो" सारखा सिनेमा बघा. "आईस एज" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. हा सिद आहे एक स्लॉथ , ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय. का? ते आपल्याला लगेच कळतं. सिदला माकडचाळे करून संकटात पडून घ्यायची खोड असते. अस्सं हे अतिशहाणं बाळ आपल्याला त्रास करू नये म्हणून त्

आईस एज : मैत्र जीवांचे - १

इमेज
तुला कार्टून्स आवडतात का? हा कुणाशीही संवाद साधताना माझा पेटंट प्रश्न झालाय. त्यात जर पोरी-बाळींशी बोलत असेल तर या प्रश्नाला जोडून "प्लीज टॉम अॅन्ड जेरी नको म्हणू हं" अशी काहीशी खवचट पुस्ती जोडतो. माझ्या संवादाचे पण असे ठराविक पॅटर्न तयार झालेत? माझ्या पिढीच्या अनेकांसारखा कार्टून्स शी माझा परिचय मोगली, टॉम अॅन्ड जेरी, अलादिन या दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या मालीकांपसूनच झाला. नंतर जशी २००० च्या आसपास घरी केबल आली तसे मग कार्टून नेटवर्क वरच्या मालिकांचा मी भक्त झालो. मला तद्दन लहान मुलांचे डेक्स्टर्स लबोरेटरी, पॉवर पफ गर्ल्स, स्कूबी डू, करेज द कॉवर्डी डॉग, ट्वीटी अॅन्ड सिल्वेस्टर मिस्टरीस, रोड रनर-कायोटी, द फ्लिनस्टोन्स हे शोस आवडायचे पण टीनटीन, जस्टीस लीग, जॉनी क्वेस्ट, स्वाट कॅट्स, जी आय जो हे माझे प्रेरणास्थान होते. आताचे आणि तेव्हाचे कार्टून नेटवर्क मध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलाय. कार्टूनच्या दुनियेला त्या जपानी अॅनिमे, पोकिमॉन वाल्यांनी पूर्ण कीड लावली. आजकाल जिकडे तिकडे ही कार्टून्स बघून एखाद्या सैगलच्या चाहत्याला कुमार सानुची गाणी ऐकून केवढे दु:ख झाले असे

डार्क नाईट राईजेस

इमेज
मागच्या शानिवारी 'डार्क नाईट राईजेस' बघितला. नोलन च्या सिनेमांकडून जी अपेक्षा असते ती खचितच पूर्ण झाली. आपलासिनेमास्कोप वर याचे गणेश मतकरींचे सुंदर परीक्षण आहे. त्यावर ही माझी प्रतिक्रिया इथे परत टाकतोय.. ---- सही परीक्षण. >>"सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसांना दिलेला असतो." उलट मला वाटते की पहिला भाग रोचक करणे दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या मानाने सोपे असते. हिरोचे इवोल्युषण दाखवण्याचे ठराविक पॅटर्न दिसतात. या पॅटर्नशी प्रामाणिक राहिले तर हमखास यश. दुसरा, तिसरा भाग म्हणजे खूप विचार करून बनवलेली कथा असते. दुसरा भाग सरस असतो याच्याशी पूर्ण सहमत. नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला. नोलन चे आणखी एका बाबतीत कौतुक वाट

संस्मरणीय जून - २

इमेज
संस्मरणीय जून - १  वरून पुढे. माथेरान अगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण. आम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला. भुसावळ हेमचंद्रांचे लग्न होते इथे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. पुणे भुसावळ हा जवळपास ५०० किमी चा प्रवास आम्ही (सुमित, निखिल, मुस्तफा, कुणाल) स्लीपर बसने केला. येता-जाता दोन्ही वेळी रात्रीचा प्रवास, मोठी बेड आणि बसही आरामदायक असल्याने गप्पाष्टकांना उधान . बेन्डीचे लग्न पण सुंदर झाले. लग्नावारून येवून लगेच माझ्या क्यामेर्यातल्या फोटो आणि विडीओचे संकलन करून मी एक छानशी क्लिप बनवून सगळ्या मित्रांना शेयर केली. लग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले- "वाटीत वाटी स्टील ची वाटी वाटीत वाटी स्टील

संस्मरणीय जून - १

इमेज
हा महिना खूप प्रवास झाला. जवळ जवळ प्रत्येक विकांताला फिरत होतो. ताडोबा, माथेरान, मावशीचे गाव बदगी आणि हेमचन्द्रांच्या लग्नासाठी भुसावळ. ताडोबा महिन्याची सुरुवातच धडाक्यात झाली. जूनच्या १ तारखेला सकाळी आमची रेल्वे वर्धा स्टेशन ला लागली. ज्या जंगलाचा उल्लेख अगदी पहिली दुसरीपासून ऐकतोय, तिथे आम्ही आता ३ दिवस घालवणार याची जाम उत्सुकता होती. वाघ बघायचा हे तर मनात होतेच. पण कुठेतरी अपेक्षाभंगाची भीती होती. म्हणून मनाची तयारी केली की वाघ बघण्यासाठी नाही तर एक परिकथेतले वृक्षराजींनी भरलेले जंगल बघायला चाललोय. मी, मुस्तफा आणि ऋषिकेश चा युवाशक्ती बरोबरचा पहिला प्रवास. आमच्या चोवीस जणांच्या ग्रुप होता. वयोगट अंदाजे १५ ते ७५. आमच्या बरोबर दोन अनुभवी लीडर्सही होते. पहिला दिवस वर्धा ते ताडोबा हा प्रवास करण्यात आणि ताडोबाच्या बफर झोन मध्ये फिरण्यात गेला. ताडोबा हे आता 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते. आम्ही अंधारीत एका रिसोर्टमध्ये उतरलो होतो. रात्री एकमेकांच्या ओळखी झाल्यावर आम्हाला लवकर उठायचे म्हणून लीडर्स ने सूचना दिल्या. विदर्भात मी पहिल्यांदाच आलो होतो, ज

काच फुटताना..

इमेज
पोस्टचं टायटल बघून पब्लिकचा काहीतरी सेंटीमेंटी, अॅबस्ट्रॅक्ट वगैरे टाकणार असा समज होऊ शकतो. यार पण अॅबस्ट्रॅक्ट विचार करून करून डोकं बधीर झालं आता, त्यामुळे कधीकधी साधं सरळ सोपं लिहिलं तर फाउल थोडी होणारे? खरच काच फुटताना पाहिली मी. तसे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी तरी हा प्रसंग येतोच. पण बऱ्याचदा ग्लास, आरसा, कपाटाचे प्यानल, घड्याळ, मोबाईल ची स्क्रीन, फ्रीज चा रॅक असे फुटकळ फुटण्याचे प्रकार पहिले असतील लोकांनी. लहानपणी एकदा जिंकून आणलेल्या गोट्या अशाच थंडीच्या दिवसात चुलीत तापवून पाण्यात टाकायच्या आणि तडकवयाच्या असले उद्योग पण केले त्या मोहापायी. कधी ती पिक्चर स्टाईल[१] ने फुटलेली काच बघितलीये? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, भयाण अशी? मागे एकदा सांगितले होते न, की विकेंडला ऑफिस ला जाऊन बसतो मी. मला कामापेक्षा त्या एकांताचं अप्रूप जास्त. पूर्ण मजला रिकामा. फक्त माझ्या क्युबिकल वर उजेड. खोल खोल शांतता. आमचे ऑफिस आहे तिथे मागच्या बाजूला डोंगर रांग आहे. तिथून खूप वेगाने वारा वाहतो. त्या वाऱ्याचा आवाज बाथरूमच्या प्यानेल्स मधून घोंगावतो मधून मधून. अशा वातावरणात दुपार होऊन किर्

दिलमे मत रख यार, बोल डाल!

इमेज
या विषयाला गंभीर करू की इनोदी करू हे सुचत नाहीये. त्यामुळे दोन्ही प्रकार एकमेकात घुसळून हा पोस्ट स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या आईसक्रीमवर लिंबाच्या लोणच्याचा खार टाकला तर जी चव येईल तसा झाला तर क्षमा. परवा पेट्रोल चे भाव पुन्हा चढवले या हरामखोरांनी. मला कार घेतल्यावर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद लोकांना मला "तुझी कार किती मायलेज देते?" हा प्रश्न विचारून होतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्य सहन करणे असह्य होते. कधीकधी बोलून जातो कि "बरे झाले दीड वर्षापूर्वी घेतली, नाहीतर आता घेण्याची हिम्मत आहे का कुणाची?" मग त्यांच्या आनंदात थोडे विरजण पडले कि कसे गार गार वाटते. काल शनिवारी रात्री उशिरा ऑफिस वरून घरी निघालो. (ही शनिवार, ऑफिस, आणि उशीर ही वेगळी कहाणी.. फुटेज खाईल.. तेच ते). रविवारी सकाळीच आजीला घेवून गावाला जायचे होते म्हणून म्हटले लगेहात पेट्रोल भरून घेवू. आमच्या कंपनीजवळच्या पेट्रोल पम्पावर घेतली आणि २००० चे टाकायला सांगितले. सवयीप्रमाणे की लोक करतात म्हणून, बाहेर येवून टँक पाशी उभा राहिलो. "झीरो बघा" इति पंप कामगार.( त्याला पेट्रोल वाढप

इंटेलिजंट स्पर्म!

इमेज
April 2012 बॉस, काहीतरी भयानक जादू झालीये. हा एप्रिल चालुये आणि आतापर्यंत या वर्षात मी तीन हिंदी सिनेमे पाहिले. ते तीनही प्रस्थापित हिंदी सिनेमाच्या समजुतींच्या पार गेले आणि एक नवीनच शाळा (school of thought) भरवलीये. पानसिंग तोमर, कहाणी आणि विकी डोनर हे नितांत सुंदर पिच्चर पाहिले. हिंदी पिच्चर बेचव आणि बिनडोक अशा समजुती घेवून वर तोंड करून हिंडणाऱ्या लोकांना (म्हणजे आम्हालाच) भयानक धक्का होता हा. नशीब आमचे की हाउसफुल सारखे सिनेमे मधेमधे येवून तो समज अगदीच खोटा नाहीये अशी सांत्वना देतात. वर नमूद केलेल्या तीनही सिनेमांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्यात कोणीही 'तुर्रम'खान नव्हता. तरीही पानसिंग आणि कहाणी तुफान चालले. आणि विकी डोनर मला एवढा आवडलाय की ज्या अर्थाने हे दोन चालले तो पण बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंका वाटत नाही. पानसिंग ला काही मोठे बजेट नव्हते पण तरीही ४०-५० वर्षांचा काळ २-२.३० तासात दाखवण्यात लैच कमाल केली. कोलकात्याला ज्या प्रकारे दाखवलय त्याला तोड नाही. हे सिनेमे कुणी लिहिले, कुणी दिग्दर्शित केले हे इथे कशाला लिहू? विकी आहेच. पण या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे. विकी ड

भांडवलवादाच्या आयचा घो? -१

इमेज
इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला असताना मी यु./एम.पी.एस.सी. च्या साप्ताहिक क्लासला जायचो. अगदीच ठरवून नव्हता लावलेला क्लास. आमच्या एस.आर्.पी.एफ. चे तत्कालीन सहृदय आणि कर्तव्यदक्ष समादेशक व्ही. लक्ष्मीनारायण [१] यांनी राबवलेल्या अनेक समाजोपयोगी योजनांपैकी हा एक उपक्रम होता. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल असल्या कुचकामी[२] विषयांची आवड भागवून घेत होतो. लक्ष्मीनारायण सरांनी कॅप्टन कोल्हटकर (यांची पुण्यात अकॅडमी आहे) त्यांची मनधरणी करून त्यांची आणि त्यांच्या शिष्यांची दर सप्ताहांताला येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. ते आम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करायचे, अभ्यास घ्यायचे, मॉक टेस्ट असायच्या. वेळ अगदी मजेत जात असे. आमचा ७-८ जणांचा नियमित उपस्थिती असलेला ग्रुप होता. बऱ्याचदा कोल्हटकर सरांचे शिष्यच यायचे शिकवायला. पण स्वत: कोल्हटकर सर् आले की आणखी मजा. सत्तरीतले सर त्यांच्या तरूणपणाच्या गोष्टी उत्साहाने सांगायचे. शाळेत ते अभ्यासात मागे होते आणि वडलांनी अपमानित केल्यावर कसे पेटले आणि कुत्र्यासारखा अभ्यास करून एम.ए. झाले आणि आर्मीत जॉईन झाले, वगैरे वगैरे. (कुत्र्यासारखा अभ्यास कसा करत