पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्र आणि राष्ट्रवाद

इमेज
  हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली? कुणीच का टिकू शकले नाही? या प्रश्नाला बरेच कंगोरे आहेत. "हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी" प्रश्नाच्या या भागात थोडा खोचकपणा जाणवतो. दैदिप्यमान इतिहास म्हणजे नक्की किती काळासाठी होता हे कसे ठरवणार? कारण गेल्या ७५ वर्षासारख्या तुलनेने कमी कालखंडात देखील भारतात ६५ चे युद्ध, ७१ चे युद्ध, आणीबाणी, दंगली, अणुस्फोट, दुष्काळ, लायसेन्स राज, भ्रष्टाचार घोटाळे, आयटी क्रांती, आनंदवनासारख्या सेवेकरी संस्था, शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गाचा उदय, उदारीकरण असे कितीतरी चांगलया आणि वाईट घडामोडी घडल्या. तर "हजारो" वर्षांमध्ये काय काय घडले असेल. काही गोष्टी चांगल्या असतील काही वाईट. या सर्वांमधून किमान "भारतभूमी" ही ओळख अंशतः तरी आपण टिकवून ठेवली म्हणून सोयीसाठी म्हणूया "हजारो वर्षांचा दैदिप्यमान". आता तथाकथित या शब्दावर येऊ. एखाद्या राष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे किंवा नाही हे कोण ठरवते? - बऱ्याचदा त्या त्या र

Quora वरील लेखी स्वरूपातील भांडणे वाचताना तुम्हाला काय वाटते?

इमेज
जर मुद्देसूद, तर्काला धरून आणि अभ्यासयुक्त टिप्पणी असेल तर वाचायला मजा येते. काहीतरी नवीन समजते. शेवटी संवादाचा हेतू एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या मुद्द्यातील कमकुवत जागांना (blindspots) भरून आणखी चांगला विचार तयार करणे हाच असतो ना? नाही म्हणजे आदर्शवत संभाषणात तर हाच हेतू असावा. तसे नसेल आणि टिप्पणी हेकेखोर, एकांगी होत असेल तर मग अशी भांडणे न करणे चांगले. शेवटी लिखित स्वरूपातील भांडणे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सहभागाशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत. अशावेळी प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही तर कदाचित ते थोडे उद्धट वाटू शकते. त्याला इलाज मलाही माहीत नव्हता. डेस्टीन हा "SmarterEveryDay" या युट्युब चॅनेल चा सर्वेसर्वा. स्वतः एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ असूनही त्याला त्याच्या व्हिडीओ वर अशा बऱ्याच टिप्पण्या यायच्या ज्यामुळे तो आधी पार वैतागून जायचा. त्याने विचारांती याच्यावर उपाय काढला. तो म्हणतो की अशा न संपणाऱ्या वादावर स्वतःचा तोल न ढळू देता नम्रता ठेवावी. जर वाद ताणत चालला तर तुम्हाला वाटेल तेव्हा हा प्रश्न विचारावा - "मी कुठला पुरावा दिला तर तुम्ही तुमचे म