पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑनलाईन शॉपिंग

इमेज
माझ्या दैनंदिन वापरातील या वस्तू मला अतिशय उपयुक्त वाटल्या. १. मच्छरांना हाकलण्यासाठी केमिकल वेपरायझजर इतकी वर्ष वापरत आलो. मला नेहमी वाटायचे की ही रसायने जी मच्छरांना नको असतात ती आपल्या शरीराला काही प्रमाणात का होईना हानिकारक असतील. पण त्याला पर्याय देखील नव्हता. मच्छरदाणी एकतर फार किचकट प्रकार. वर लावली की फॅन ची हवा देखील लागत नाही. मच्छरांना मारण्यासाठी रॅकेट देखील आहेच, पण ते घेऊन मच्छरांच्या मागे टेनिस खेळावे लागते. त्यामुळे नाईलाजाने का होईना, गुडनाईट, ऑल आऊट सारखे वेपरायझर्स महिन्यातून दोन वेळा आणून लावणे हाच पर्याय होता. घरात बाळ आल्यापासून गुडनाईट वेपरायझर वापरणे आणखी धोकादायक वाटू लागले होते. असे काही असेल का जेणेकरून या व्हेपरायझर पासून सुटका होईल, हे शोधताना मला खालील लॅम्प सापडला. याचे कार्य इलेक्ट्रिक रॅकेट सारखेच आहे पण निळ्या प्रकाशाकडे मच्छर स्वतःहून आकर्षित होऊन मरतात. मला तर घेण्यापूर्वी विश्वासच नव्हता. पण एक दोन दिवसातच याची उपयुक्तता कळली. आज दोन महिने झाले आम्ही घरात गुडनाईट किंवा ऑलआऊट आणले नाही. हा लॅम्प एका ठिकाणी लावून झोपले कि मच्छरांचा काहीही त्रास होत

The Wroclaw Experience

इमेज
What is the review on the Wroclaw University of Technology Poland for Indian students? I went to Wroclaw to get the European Experience. I had the experience of working as a software professional for 8 years before I moved to Wroclaw.  I have a bachelor's degree in Mechanical Engineering and took a course in Automotive Engineering at the Wroclaw University Of Technology in 2015. I will be blatantly honest here. If you are an Indian student with no prior work experience and choose to go to Poland just because you didn't get admission to a German University, please don't go to Poland. If the German Universities have assessed you to be unfit for a program, there are mighty chances that you are unfit for a program in any Polish university. There could be exceptions, but please, do not kid yourself. Education in Wroclaw is not easy. Just because you got admission easily doesn't make the rest of the education easy. I had to study hard to pass many of the subjects. It was not

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक

इमेज
मूळलेख ( माझा मूळ इंग्रजी लेख ब्लॉग वर प्रकाशित केल्याचा दिनांक - जानेवारी २०१८) मी माझ्या आजीला (वय 85 वर्षे, पुणे) डॉ. पांडुरंग कुंभार यांच्या दवाखान्यात तिच्या अर्धांगवायूच्या उपचारासाठी घेऊन गेलो होतो. माझ्या आजीला 20 नोव्हेंबर 2016 रोजी अर्धांगवायूचा झटका आला. पहाटेच्या सुमारास तिला उजव्या हातामध्ये सुन्नपणा जाणवला आणि ती आमची उठण्याची वाट पाहत होती. तिने आम्हाला सांगितले की तिला तिचा उजवा हात अजिबात हलवता येत नाही. ती व्यवस्थित बोलू शकत होती. आम्हाला वाटले की थंडीमुळे ते तात्पुरते सुन्न झाले असेल. 4 तासांनंतरही ती हलू शकली नाही तेव्हा आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि आम्हाला सांगितले की हा अर्धांगवायूचा झटका होता आणि तिच्या उजव्या हाताचा 90% आणि उजव्या पायाचा 60-70% भाग अर्धांगवायूमुळे निश्चल झाला होता. डॉक्टरांनी नमूद केले की अशा परिस्थितीत लवकरात लवकर उपचार चालू केले तर बरे होण्याची शक्यता जास्त असते. तिला पुढील 1 आठवडा दवाखान्यात औषधे, इंजेक्शन्स आणि फिजिओथेरपी दिली गेली. तिची प्रकृती स्थिर होती पण आम्हाला काहीच सुधारणा दिसत नाही. सर्व प्रिस

आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत

इमेज
आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत? प्रश्न चांगला आहे. खरेतर १० पेक्षा जास्तच गोष्टी थांबवल्या असतील पण प्रश्नचा मान राखून १० गोष्टी आठवून लिहितो. १. तुलना करणं प्रत्येकाचा मार्ग वेगळा. आज कुणाकडे काय आहे कुणाकडे काय नाही, अमक्याचा पगार एवढा माझा केवढा या तुलना आता नको वाटतात. सगळे जण आपापल्या परीने आपापले जीवन सुंदर करत आहेत हेच खूप नाही का? अब्जाधीश गुंतवणूकदार आणि तत्वज्ञ नवल रविकांत म्हणतात की तुलना करून एखाद्याबद्दल असूया आपण त्याच्या आयुष्याचा एकांगी विचार करून करतो. एखाद्याचे आयुष्य तुमच्यापेक्षा चांगले आहे आणि तुम्हाला तसे पाहिजे असेल तर त्याच्यासारखे सरसकट आयुष्य मिळालेले चालेल का? उदाहरणादाखल आज जर कुणाला रतन टाटांची संपत्ती मिळाली तर त्यांचे वार्धक्य पण घेण्याची तयारी पाहिजे. "जावे त्यांच्या वंशा" लहानपणापासून ऐकतोय, आता अनुभूती घेतोय. असूया माणसाचा स्वभावदोषच आहे, तरीपण तुलना करायची असेल तर आज आपण जसे आहोत ते कालच्यापेक्षा चांगले आहोत का नाही याची करतो. म्हणजे स्वतःशीच. २. न्यूज बघणं आता मी भारतीय न्यूज चॅनेल बघणे सोडून दिले आहे. ९०% चॅनेल्स बातम

संघटन शक्तीची गरज काय?

इमेज
संघटन शक्तीची गरज काय? कोरा.कॉम वरील या प्रश्नासाठी माझे उत्तर - ​फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कंपनीच्या ऑफिशियल चॅट वर सकाळीच एका टीममेट चा मेसेज आला. "Hi Ashish, do you have some time today? need to talk". आजकाल असे मेसेज आले कि कि धस्स होतं. त्यातल्या त्यात उत्कृष्ट काम करणारे सहकारी असतील तर जास्तच. अमेरिकेमध्ये जसे "ग्रेट रेसिग्नेशन" चालू आहे तसे भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये "ग्रेट स्विच" चालू आहे. लोक कंपन्या बदलतात, दुप्पट तिप्पट पगार वाढवतात. त्यामुळे एखाद्याला टिकवून ठेवणे, किंवा राजीनामा आल्यावर रिटेन करणे म्हणजे महाकठीण काम बनले आहे. आता हा सहकारी, सोयीसाठी त्याला "क्ष" म्हणू कंपनीत जॉईन होऊन फक्त तीन महिने झाले होते. पण पठ्ठा फ्रेशर असूनही कॉलेजमध्ये असतानाच स्वतःहुन कोर्सेस करून आला होता. त्यामुळे खरोखर एक चांगला सहकारी मिळाल्याचे टीम मॅनेजर म्हणून मला आणि बाकी टीमला देखील समाधान होते. अगदी काही दिवसाच्या अवधीतच त्याने कोड बेस समजून नवीन डेव्हलपमेंट देखील सुरु केली होती. संवादकौशल्य देखील उत्कृष्ट होते. नुकताच जॉईन झाल्यामुळे किमा

विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का?

इमेज
विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का? सिटीझन केन नावाचा हॉलिवूड चा एक जुना माझ्या आवडीचा चित्रपट आहे. चित्रपट सुरु होतो तेच त्यातला अब्जाधीश वृद्ध नायकाच्या तोंडी शेवटचे शब्द असतात - 'रोझबड'. मृत्यूसमयी तो हे का म्हणाला आणि त्याचा अर्थ काय याविषयी माध्यमांत अंदाज आणि तर्क चालू होतात. नंतरचा संपूर्ण चित्रपट या नायकाची म्हणजे 'चार्ल्स केन' याची जीवनकहाणी आहे. रोझबड म्हणजे काय यासाठी जंग जंग पछाडणारे वार्ताहर नायकाच्या एका जवळच्या मित्राला त्याबद्दल विचारतात त्यावर त्यालाही काही माहित नसते. पण तो त्याचे अनुमान सांगतो की ती एखादी व्यक्ती असेल जी केन महाशयांच्या लक्षात राहिली. यावर त्या वार्ताहराचे समाधान न झाल्याने तो म्हातारा मित्र पुढील गोष्ट सांगतो. मिनिटभराचा हा संवाद हॉलिवूड च्या उत्कृष्ट संवादांपैकी एक आहे. A fellow will remember a lot of things you wouldn't think he'd remember. You take me. One day, back in 1896, I was crossing over to Jersey on the ferry, and as we pulled out, there was another ferry pulling in, and on it, the

राष्ट्र आणि राष्ट्रवाद

इमेज
  हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली? कुणीच का टिकू शकले नाही? या प्रश्नाला बरेच कंगोरे आहेत. "हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी" प्रश्नाच्या या भागात थोडा खोचकपणा जाणवतो. दैदिप्यमान इतिहास म्हणजे नक्की किती काळासाठी होता हे कसे ठरवणार? कारण गेल्या ७५ वर्षासारख्या तुलनेने कमी कालखंडात देखील भारतात ६५ चे युद्ध, ७१ चे युद्ध, आणीबाणी, दंगली, अणुस्फोट, दुष्काळ, लायसेन्स राज, भ्रष्टाचार घोटाळे, आयटी क्रांती, आनंदवनासारख्या सेवेकरी संस्था, शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गाचा उदय, उदारीकरण असे कितीतरी चांगलया आणि वाईट घडामोडी घडल्या. तर "हजारो" वर्षांमध्ये काय काय घडले असेल. काही गोष्टी चांगल्या असतील काही वाईट. या सर्वांमधून किमान "भारतभूमी" ही ओळख अंशतः तरी आपण टिकवून ठेवली म्हणून सोयीसाठी म्हणूया "हजारो वर्षांचा दैदिप्यमान". आता तथाकथित या शब्दावर येऊ. एखाद्या राष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे किंवा नाही हे कोण ठरवते? - बऱ्याचदा त्या त्या र

Quora वरील लेखी स्वरूपातील भांडणे वाचताना तुम्हाला काय वाटते?

इमेज
जर मुद्देसूद, तर्काला धरून आणि अभ्यासयुक्त टिप्पणी असेल तर वाचायला मजा येते. काहीतरी नवीन समजते. शेवटी संवादाचा हेतू एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या मुद्द्यातील कमकुवत जागांना (blindspots) भरून आणखी चांगला विचार तयार करणे हाच असतो ना? नाही म्हणजे आदर्शवत संभाषणात तर हाच हेतू असावा. तसे नसेल आणि टिप्पणी हेकेखोर, एकांगी होत असेल तर मग अशी भांडणे न करणे चांगले. शेवटी लिखित स्वरूपातील भांडणे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सहभागाशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत. अशावेळी प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही तर कदाचित ते थोडे उद्धट वाटू शकते. त्याला इलाज मलाही माहीत नव्हता. डेस्टीन हा "SmarterEveryDay" या युट्युब चॅनेल चा सर्वेसर्वा. स्वतः एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ असूनही त्याला त्याच्या व्हिडीओ वर अशा बऱ्याच टिप्पण्या यायच्या ज्यामुळे तो आधी पार वैतागून जायचा. त्याने विचारांती याच्यावर उपाय काढला. तो म्हणतो की अशा न संपणाऱ्या वादावर स्वतःचा तोल न ढळू देता नम्रता ठेवावी. जर वाद ताणत चालला तर तुम्हाला वाटेल तेव्हा हा प्रश्न विचारावा - "मी कुठला पुरावा दिला तर तुम्ही तुमचे म