पोस्ट्स

Featured Article

वाद पाहावा करून

इमेज
मागच्या वर्षी हेलसिंकीत राहात असताना, कॅम्पसवर फिरताना अक्षरशः सतराशे साठ प्रकारचे क्लब्स, ग्रुप्स आणि सोसायट्यांची पोस्टर्स दिसायची - ट्रेकिंग क्लब्स, योगा ग्रुप्स, बायबल स्टडी सर्कल्स, तत्त्वज्ञान चर्चा मंडळं, अगदी कोणती कल्पना करा ती सापडेल! अश्यात एक दिवस एका साध्याशा पोस्टरवर नजर पडली - "Join Helsinki Debating Society." वाद घालणे हा माझा आवडता विषय, त्यामुळे लगेच वाटलं - "चला, जरा टाईमपास होईल, नवीन लोक भेटतील, आणि आपली बोलायची हौस पण पूर्ण होईल!" मार्च महिना होता. हेलसिंकी बर्फात गाडलेलं, त्यात त्या दिवशी पाऊसही पडत होता - त्यामुळे हवेत एक भन्नाट गारवा पसरलेला. अशा थंडगार संध्याकाळी मी एका बिल्डिंगच्या तळघरात पोचलो. बरीच मंडळी आधीच जमली होती. मनात कल्पना होती की, एखादा विषय देतील, दोन गट पडतील, आणि वाद घडवतील. पण प्रत्यक्षात तिथल्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी सुरुवातीलाच आम्हाला एका ठराविक पद्धतीने वाद घडवायचे नियम समजावले - British Parliamentary Debate Style. थोडक्यात, ही पद्धत अशी असते: दोन टीम्स नाहीत - चार टीम्स असतात: दोन "Government" बाजूच्या (जो...

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

इमेज
मी गेले काही महिने फिनलंड च्या हेलसिंकी या राजधानी शहरात आहे. गेल्या ७ वर्षांपासून फिनलंडला सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून घोषित करतायेत त्यामुळे इथे येण्यापूर्वीच उत्सुकता होती. भारताचा नंबर एवढा मागे का हे मलादेखील कोडेच आहे. मागे मागे तर मागे, रशिया, पॅलेस्टाईन, युक्रेन या युद्धाने गांजलेल्या देशांपेक्षा किमान या वर्षी तरी भारताचा वरचा नंबर असावा अशी अपेक्षा होती. त्यामुळे या Happiness Index भानगडीवर किती भरोसा ठेवायचा हे समजून जाते. पहिले तर आनंद म्हणजे काय याची व्याख्या बघायला हवी. कारण जे हा आनंद निर्देशांक बनवतात, ते स्वतःच्या व्याख्येनुसार सर्वेक्षण करत असतील, तर बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात. मागे इंग्रजी कोरावरच एका आफ्रिकन नागरिकाचे उत्तर वाचण्यात आले होते. जगातल्या गरीब राष्ट्रांमध्ये त्याच्या देशाचा वरचा नंबर होता. पण त्याचे म्हणणे असे होते कि त्याने त्याच्या आजोबांना एवढ्या गरीब राष्ट्रामध्ये राहून देखील कधी दुःखी पाहिले नाही. त्यांनी कधी कर्ज घेतले नाही, कधी फार आजारी पडले नाहीत, स्वतःच्या शेतात पिकेल ते खाऊन अगदी ठणठणीत आयुष्य जगले. त्यांच्यासारखे असे बरेच जण त्याच्या...

आजोबांनी गिरवले सत्तरीत संगणकाचे धडे आणि बनले सॉफ्टवेयर डेव्हलपर

इमेज
 सुहास पाटील हे नाव जागतिक विव्दान आणि उद्योजकांमध्ये आदराने घेतले जात असले तरी सर्वसामान्य मराठी घरांमध्ये क्वचितच माहित असेल.  सुहास पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात जमशेदपूर येथे १९४४ मध्ये झाला. वडील श्रीकृष्ण पाटील हे टिस्को (टाटा स्टील) मधील अभियंते. छोट्या सुहास ला वडिलांच्या प्रतिभेचा वारसा होता. सुहासने स्वतंत्र भारतात नव्याने स्थापन झालेल्या भारतीय प्राद्योगिकी संस्थान म्हणजे आयआयटी मधून पदवी मिळवून अमेरिकेच्या प्रथितयश एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. १९७० साली पीएचडी मिळवळी. त्यांनी १९८१ साली अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी या शहरात पाटील सिस्टिम्स नावाची संगणकाचे सुटे भाग बनवणारी कंपनी काढली. आज ही कंपनी सिरस लॉजिक (Cirrus Logic) या नावाने ओळखली जाते. पावणेचार हजारापेक्षा जास्त पेटंट्स मिळवलेली हि कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. अशा या कर्तबगार सुहास चे वडील - श्रीकृष्ण पाटील हे आपल्या मुलासोबत राहण्यासाठी सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेले. स्वतःच्या रेडिओ दुरुस्त करण्याच्या छंदाला आणखी पुढे नेत आपल्या लेकाच्या या घरी संगणक पहिल्यांदा शिकले. ज्या देश...

धटुकले मोदीजी

इमेज
"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?" कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर- या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू. मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते. चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे...

चिमणी उडाली भुर्रर्र

इमेज
प्रश्न :  संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला? ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर समाजाच्या लोकांनी संस्कृत भाषेचा कधीच वापर केला नाही का? भूतकाळातले सोडा या लोकांनी नवीन भाषेवर अधिकार स्थापन केलाय. ---- मी ब्राह्मण समाजातला नाही. ---- मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे. ---- आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्...