पोस्ट्स

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

इमेज
भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का? आणि का? आपल्या देशाच्या आकारमानाने हा खर्च अवाढव्य नक्कीच नाही. अवाढव्य खर्च हे विशेषण संरक्षण खर्चाच्या बाबतीत योग्य शोभेल. भारताला स्वतःचा अवकाश कार्यक्रम का हिताचा आहे, हे आता सर्वश्रुत आहेच. मी तुम्हाला एक आणखी बाजू सांगतो. कोणत्याही देशाला त्याची ओळख बनवावी लागते. बनवली नाही तरी ती आपसूक बनते. काहीवेळा चांगली असते काहीवेळा देशांतर्गत दुर्जनांमुळे किंवा देशाबाहेरच्या हितशत्रूंमुळे वाईटही ओळख बनते. सरकार वेळोवेळी इनक्रेडिबल इंडिया सारख्या जाहिरात मोहीमा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्याचे काम करत असते. पण अशा जाहिराती एका ठराविक मर्यादेपर्यन्तच काम करू शकतात. तरीही अशा आंतरराष्ट्रीय जाहिरातींना काही कमी खर्च येत नाही.[१] मग त्यापण करू नयेत का? आता तुम्ही म्हणाल इथे अवकाश मोहिमांचा काय संबंध? आहे. भारताच्या अवकाश मोहीमा हा त्याच्या ओळखीचा, ब्रॅण्डिंग चा भागही आहेत. वैज्ञानिक प्रगती, स्वनिर्मित तंत्रज्ञान, परकीय चलन, भविष्यामधील आव्हानांची तयारी, प्रगत देशांच्या मध्ये मान आणि शत्रुदेशांना धाक या पल...

विरळ आणि संस्मरणीय

इमेज
तुम्ही अशी कोणती नैसर्गिक घटना अनुभवली जी इतकी विरळ आहे की परत ती बघणे होणार नाही असे तुम्हाला वाटते? 1. सिंहेचा उल्कावर्षाव हा उल्कावर्षाव दरवर्षी 17 नोव्हेंबर च्या पहाटे दिसतो. टेम्पल टटल हा धूमकेतू दर काही दशकांनी सुर्याजवळ येतो. या धूमकेतूने मागे ठेवलेल्या कणांमधून पृथ्वी जाते तेव्हा हे कण आणि कधीकधी मोठे दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हा उल्कावर्षाव दरवर्षी जरी घडत असला तरी काही दशकांमध्ये याचा जोर जास्त असतो. धूमकेतू जर अलीकडेच सुर्याजवळ येऊन गेला असेल तर आकाशात आतषबाजी सारख्या उल्का दिसू शकतात. साल 1998 का 99 ला नक्की आठवत नाही. जगभरात या वर्षी leonids shower जबरदस्त होणार म्हणून उत्साह होता. मी माझ्या एका मित्राला तयार केले आणि 17 नोव्हेंबर च्या रात्री 3 वाजताच्या दरम्यान आम्ही अंधाऱ्या परेड ग्राउंडवर पोचलो. सुरवातीला मान वर करून पाहत होतो पण थोड्या वेळातच ओणवे व्हायची वेळ आली. पावसा सारख्या नाही पण मिनिटाला 4–5 उल्का पाहिल्याचे आठवते. आम्ही काही तास तो सोहळा पाहिला. त्या रात्रीनंतर मी कधीही एवढ्या मोठया प्रमाणात उल्का पहिल्या नाहीत. Leonids - Wikipedia 2. ' तोतापुर...

ऐकण्याचे कौशल्य

इमेज
"ऐकणे” (लिसनिंग स्किल) हे कौशल्य कसे रूजवतां येईल हा अतिशय चांगला प्रश्न आहे. संवादामध्ये समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे हे फार महत्वाचे आहे. जर आपण त्या संवादातून स्वतःच्या जाणिवेमध्ये वृद्धी नाही केली आणि आपले स्वतःचेच आधीच तयार असलेले विचार रेटले तर त्या संवादाचा आपल्याला काय उपयोग? स्वतः शहाणे आहोत हा इगो कुरवाळता येईल, पण काही मूल्यवर्धन होणार नाही. बऱ्याचदा आपण संवाद करताना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे समोरचा कधी आपलं म्हणणं संपवतोय याची आपण अधीरतेने वाट पाहतो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती नक्की काय म्हंटली हे अर्धेअधिक निसटून जाते. आणि फक्त आपल्याला आधीच अपेक्षित असलेले शब्द, विचार हेच नेमके पकडून त्याच्यावरच आधारित आपले उत्तर देऊन आपण त्या संवादाची दिशा आपल्याला हवी तशी वळवतो. पण हा सुसंवाद नाही. सुसंवादात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार ऐकून घेतले गेले आणि दुसऱ्याचे विचार समजले अशी भावना आली पाहिजे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संवादामध्ये चांगले ऐकण्यासाठी हे करायला हवे - १. आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकत तर नाही आहोत ना याचे भान ठेवावे. काही सेकंदापु...

The ruthless shrink we all need

इमेज
Which supporting character stole the scene every time they appeared? Jane Lynch. There are very few TV series fans who haven’t watched Two and a Half Men. The series was a brilliant comedy until Charlie Sheen had his act together. I believe the series started to deteriorate well before his meltdown, somewhere around season 3. However, I must admit that immersing myself in the humor, memorable quips, and performances of the unforgettable actors was one of life's joys. However, had it not been for the sheer brilliance of Jane Lynch, I would have rated the series 50% lower. This realization came to me in retrospect because whenever I feel like rewatching anything related to Two and a Half Men, I instinctively search for those scenes on YouTube, specifically "when Charlie goes to the shrink." Jane Lynch portrayed the character to perfection, breathing life into the therapist. Her hippie wardrobe became an integral part of the character, and the dialogues were a treat. The sar...

लग्न पहा 'बे' करून

इमेज
  सध्या लग्न जुळवणे कठीण का होत चालले आहे? मी लग्नाच्या वयाचा झालो असताना, म्हणजे साधारण सव्वीसाव्या वर्षी यावर गहन विचार केला होता. गहन विचार करणे हा स्थायीभाव असल्याने, लग्न जुळण्याच्या काठिण्यपातळीत वाढच झाली होती. तर हे त्या वेळेचे विचार मी माझ्या ब्लॉग पोस्ट मध्येसविस्तर पणे मांडले आहेत [1] . इथे  ते आणि आणखी काही मुद्दे सांगतो - १.  माणसाचे वाढलेले आयुष्यमान  आणि त्यात आलेले सातत्य हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५०-६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि ना...